मॅरॅथॅान
- leena dhawan
- Feb 18, 2021
- 2 min read
अलीकडेच शाळेतल्या मित्र- मैत्रिणींचा whatsapp group join केला आणि मन भुरकन् उडून कधी नव्वदच्या दशकात पोहोचलंकळलंच नाही. शाळेतल्या जीवाभावाच्या मैत्रिणी नंतर कधी दुरावल्या कळलं सुद्धा नाही. आणि आता त्यांना असं virtually भेटतानाप्रचंड उत्सुकता होती... मग काय ... अगदी फुरसतीने बसले आणि केली stalking ला सुरुवात. काही ठराविक मंडळींबद्दल तरकमालीची उत्सुकता होती. Profiles मागून profiles बघत गेले तशा अनेक गोष्टी दिसू लागल्या.
सगळेजण अगदी वेगवेगळ्या fields मध्ये विखुरलो होतो.. शाळेत जी “जाडी” ह्याच नावाने famous होती ... अगदी एवढी की तिचीओळख करून देतानासुद्धा मला तिचं खरं नाव आठवावं लागलं होतं ... ती आता one piece मध्ये खुलून दिसत होती.
ह्याउलट जी sports captain होती तिने चांगलंच weight gain केलं होतं.
जे अभ्यासात अगदी यथातथा होते त्यांनीही चांगली प्रगती केली होती ...
त्यांना पाहतांना “शाळेतल्या स्कॅालर्सनी काही मोठा तीर नाही मारला” ... असं मला आपलं उगाचच वाटून गेलं.
कोणाला मुलं होती तर कोणी अजूनही “DINK” होतं. .... कोणाचं तर लग्नच झालं नव्हतं तर कोणाचा status confused असा होतां.
संध्याकाळी ममा शी बोलताना तिला हा सगळी वृत्तांत दिला आणि तिने अपेक्षित प्रश्न विचारला... “ तो xyz (नाव नाही mention करत) काय करतो गं?”
“वाटलंच मला. “ - मी फिस्कारले
“अगं curiosity वाटली.” - ममा ने सारवासारव केली
“ तो US मध्ये असतो. छ्छान आहे बरं... तुला काही contact वगैरे करायचाय का त्याला?” - मी कुत्सितपणे म्हटलं
“नाही बाई” - तिने विषय संपवला
मला आठवतं तो xyz आमच्या सगळ्यांच्याच पालकांचा आवडता होता. एकदा एका स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट आला आणि त्यात त्याचंनाव नव्हतं. ज्यांचं होतं त्या आम्हा सर्वांनी ही गोष्ट घरी सांगितली.
We all hated him like anything.
आजही ते आठवलं की मला हसू येतं.
किती वेडे असतो आपण .... त्या लहान सहान परीक्षा तेव्हा कित्ती कित्ती महत्त्वाच्या वाटतात.
त्या परीक्षांचा importance कमी आहे असं म्हणण्याचा माझा हेतू अजिबात नाही, परंतु
आता वाटतं सगळं आयुष्यच एक परीक्षा आहे, आणि त्यात येणारं यशापयश हे फक्त लहानसहान consequences आहेत.
जसं एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून कोणी परीक्षेत नापास होतं नाही; तसंच एखाद्या अपयशाने कोणाचं आयुष्य संपत नाही.
इतके सगळे profiles बघून वाटलं की जीवनातील एक phase किंवा एखादा episode यश किंवा अपयश ठरवू शकत नाही. तसंचप्रत्येक व्यक्तीला सगळी सुखंही मिळू शकत नाहीत.... रामदासांनी म्हटलंच आहे... जगी सर्व सुखी असा कोण आहे
आयुष्य हे 100 मीटर्स च्या रेस सारखं नसतंच मुळी... ते मॅरॅथॉन असतं. त्यात patience हवा, सातत्य हवं, दूरदृष्टी हवी. मुख्य म्हणजेयोग्य attitude हवा... स्वत:ला ओळखण्याचा ... स्वत:च्या strengths वर focus करण्याचा आणि कमजोरींवर विजय मिळवण्याचाअथवा त्यांना dodge करण्याचा.
प्रयत्न करूया की आपल्या मुलांना हे गमक शिकवू शकू जेणेकरून कोणी औदासीन्यातून स्वत:ला संपवणार नाही... जेणेकरूनकरिअरचे नवे मार्ग आत्मविश्वासाने चोखाळले जातील... जेणेकरून यशापयाशाच्या खर्या परिभाषा नव्या पिढीला कळतील.
Comentários